वैशिष्ट्यीकृत पोस्ट

माझाही ब्लॉग असावा...

               मित्रांनो ... आयुष्य मिळाले आहेच तर त्याचा सदुपयोग करायलाच हवा.. नाही का ! संगणकाच्या माध्यमातून जग आपल्या अंगणापर्यंत आले आ...

रविवार, ३ जानेवारी, २०१६

माझाही ब्लॉग असावा...

               मित्रांनो ... आयुष्य मिळाले आहेच तर त्याचा सदुपयोग करायलाच हवा.. नाही का ! संगणकाच्या माध्यमातून जग आपल्या अंगणापर्यंत आले आहे... हां , अंगण दुरावत चाललेय हेही चुकीचे नाहीच.परंतु हा अविष्कार सुखावणारा नक्कीच आहे.जोवर जीवन आहे तोपर्यंत जगून घ्यायचे... हाय काय अन नाय काय ! ते एक गीत आहे बघा...

                                               'सजन रे झूठ मत बोलो ,
                                                                खुदाके पास जाना है |
                                              न हाथी है न घोडा है,
                                                             वहां  पैदल ही  जाना है |

             आता यातील कल्पनाविलास सोडला तर आयुष्याचा सार या चार ओळींमध्ये आहे.परंतु आपण खरोखरच हा विचार कधी करतो का ? आपल्या जिंदगीची रफ्तारच अशी झालीये की ती आपल्याला जिंदगीबाबत विचारच करू देत नाहीये. आपली जिंदगी म्हणजे ना...
                                   'जिंदगी झंड है..
                                           फिर भी घमंड है |
              आपण जीवन जगता-जगता इतके पुढे आलो की विश्वासच बसत नाही. अन्न वस्त्र अन निवार्याच्या रहाटगाडग्यातच आपण फिरत राहिलो आणि काही जगता येण्यासारखे क्षणही आपल्या हातून निसटून गेले... आणि त्या  सर्वार्थाने जगता न आलेल्या क्षणांच्या भळभळत्या  जखमा उरात साठवून आपण आशेपायी चालतच आहोत आणि हाती आलेले क्षण निसटत आहेत...
                   आशा ही गाढवाच्या तोंडासमोर थोडे अंतर राखून बांधलेल्या घासाच्या पेंढीसारखीच आहे.. गाढव त्या पेंढीच्या आशेने चालतच राहते... मरेपर्यंत.  म्हणतात ना.., इच्छा सर्व दुःखांचे मूळ आहे. इच्छा किंवा अपेक्षा धरली आणि ते मिळाले नाही तर दुःख.... आजपर्यत जे जगलो ते याच पद्धतीने... आता थोड स्वतःसाठी म्हणून वाटले ,
      माझाही ब्लॉग असावा. ...
                                                                                      - बाळासाहेब भोसले


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा